Rising Dementia Cases in Mumbai Highlight Need for Care and Caution: महाराष्ट्रात डिमेंशिय (स्मृतिभ्रंश) चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामुळे राज्य मानसिक आरोग्य संकटाच्या विळख्यात सापडले आहे. राज्यातील अंदाजे चार-पाच लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत, तर फक्त मुंबई शहरात अंदाजे ५०,००० ते ७०,००० लोक डिमेंशियाने ग्रस्त आहेत. यापैकी बरेच रुग्ण त्यांच्या स्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. वेगाने पसरणाऱ्या या आजारामुळे कुटुंबे, समाज आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
जगभरात ५५ दशलक्षाहून अधिक लोक डिमेंशियाने ग्रस्त आहेत. २०५० पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याची अपेक्षा आहे. आकडेवारीनुसार, केवळ भारतात ४० लाखांहून अधिक लोक डिमेंशियाने ग्रस्त आहेत. मुंबईतील वरिष्ठ मेंदू व मज्जासंस्थातज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितले, की अल्झायमर रोग हा डिमेंशियाचे सर्वात सामान्य कारण आहे. जो हळूहळू स्मरणशक्ती, विचार आणि दैनंदिन कार्यावर परिणाम करतो. तो प्रामुख्याने वृद्धांवर परिणाम करतो; परंतु कुटुंबीयांवर व समाजावर त्याचा परिणाम खोलवर होतो.
Alzheimer’s Disease: पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अल्झायमरचा अनुभव वेगळा का येतो? ; जाणून घ्या ही कारणे किंवा स्त्री व पुरुषांमधील अल्झायमर: फरक व कारणे आजार रोखण्यासाठी...अल्झायमर हे केवळ वैद्यकीय आव्हान नाही तर एक सामुदायिक आव्हानदेखील आहे. महाराष्ट्रात व्यापक जागरूकता, काळजीवाहक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. लवकर निदान, वैद्यकीय सेवेने जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो.
धूमपान-मद्यपान टाळा...सर्व डिमेंशिया टाळता येत नाहीत. दरम्यान, काही पावले उचलून धोका कमी करता येतो. यामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करणे, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे, मेंदू सक्रिय ठेवणे, वाचन करणे, कोडी सोडवणे, नवीन कौशल्ये शिकणे, सामाजिकदृष्ट्या जोडलेले राहणे आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळणे यांचा समावेश आहे.
Early Signs of Dementia: छोट्या-छोट्या गोष्टी विसरत आहात? डिमेन्शियाच्या सुरुवातीच्या या ५ चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका गरज समुपदेशनाचीपूर्ण उपचार नसले तरी, उपलब्ध औषधे लक्षणे कमी करू शकतात. संज्ञानात्मक प्रशिक्षण, फिजिओथेरपी, व्यावसायिक थेरपी आणि काळजीवाहक समुपदेशन यांसारख्या औषध-आधारित हस्तक्षेपदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात.