महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामान कायम राहणार
हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले
Maharashtra Today Weather Update राज्यात एकीकडे मे महिन्याच्या कडक उन्हाने नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे काही भागांत हवामानात अचानक बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील विविध भागांत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Cancer : घसा दुखणे गंभीर आजार? Throat Cancer ची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्यादरम्यान, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी (Ratnagiri), रायगड(Raigad), ठाणे, मुंबई (Mumbai) आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. विशेषतः मुंबई आणि उपनगरांत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे.
Nashik : नाशिकमध्ये खळबळ! घरकुल योजनेसाठी लाच घेताना बडा अधिकारी जाळ्यात सापडला; ACB ने मुसक्या आवळल्याउद्या शनिवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपलेकाल म्हणजेच गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका महाड आणि पोलादपूर तालुक्याला बसला. महाडमधील खरवली, ढालकाठी, सोलमकोंड भागात वादळामुळे घरांची छपरे उडून नुकसान झाले. झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. पोलादपूर तालुक्यातील परसुळे गावातील गावातील घरांचे देखील या वादळी पावसात नुकसान झालं. विजेचे खांब पडून तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता